जयपूर : महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा गौप्यस्फोट राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केला आहे. तसेच राजस्थानमधील सरकार पाडण्यासाठी भाजप कारस्थान रचत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. एवढचं नाहीतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राजस्थानमधील काँग्रेस नेत्यांना भेटल्याचा दावाही अशोक गहलोत यांनी केलाय. देशात पाच सरकारं पाडली असून राजलस्थान सरकारही पाडणार, असं भाजपच्या वतीने काँग्रेस आमदारांना सांगण्यात आल्याचंही अशोक गहलोत म्हणाले.
Read more –