अमरावती : राज्यमंत्री बच्चू कडू हे हजारो शेतकऱ्यांना घेऊन दिल्लीतील किसान मोर्चाला समर्थन देण्यासाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनाने मोर्चा घेऊन निघाले आहेत. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी आधी राज्यातील शेतकऱ्यांवर लक्ष द्यावे, अशी टीका भाजपने केली आहे. बच्चू कडू यांच्या या आंदोलनाला प्रतिउत्तर म्हणून गुरुकुंज मोझरीमध्ये आज भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता दिघडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. उद्या भाजप हे बच्चू कडू यांच्या बेलोरा गावात आंदोलन करणार आहेत.
Read more –
https://marathi.abplive.com/news/maharashtra/bjp-criticizes-bacchu-kadu-agitation-835836