नवी दिल्ली: केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरुद्ध दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी आंदोलनावर बसले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरकारने अहंकाराची खुर्ची सोडून शेतकऱ्यांना त्यांचा हक्क आणि अधिकार द्यायला हवा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. दिल्लीच्या सीमेवर गेल्या 6 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरु आहे. (Rahul Gandhi criticize PM Narendra Modi on farmers agitation)
Read more –