वसई विरार नालासोपारा शहरात ही आज भारत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. रिक्षा, दुकाने आज सकाळपासून बंद ठेवण्यात आली आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने आज वसई रेल्वे स्थानकाजवळ उतरून दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्याची विनंती केली. त्याला चांगला प्रतिसाद ही मिळाला. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यास विरोध म्हणून आज भारत बंदच आवहान करण्यात आलं होतं. वसई विरारमधून या बंदला राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना सहित, येथील सत्ताधारी पक्ष बहुजन विकास आघाडीने ही पांठिबा दिला आहे.
Read more –